अल्पारंभ
-
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !
संत तुकाराम यांचा अभंग आणि त्याचा भावार्थ. येऊ घातलेल्या आषाढी एकादशी निमित्त, महाराष्ट्रातील संपन्न अशा संतपरंपरेतील, विठ्ठलावरील रचना वाचत होते. जसजशा या रचना वाचित गेले तसतसा त्यांच्या रचनानाकारांविषयी (ज्ञाना, नाथा, नामा, तुका , चोखा, जना इ.) आदर दुणावत गेला. लौकिक अर्थाचे शिक्षण नाही, घरातील सांपत्तिक परिस्थिती हलाखीची, जातीयव्यवस्थेमुळे समाजातून मिळणारा तिरस्कार.. अशा दुःखी-कष्टी अवस्थेतेतही, केवळ… Continue reading
-
प्रवास .. मानवकेंद्रीत ते मानव विरहित व्यवहारांचा
एक आढावा असे म्हणतात की ही सृष्टी निर्माण झाली ती एका ओमकारापासून. वर्षानुवर्ष कालचक्र फिरते आहे आणि सृष्टी तिच्या मायेचा खेळ खेळते आहे. ह्या खेळात करोडो जीव, जंतू,वृक्ष,जलचर एकत्रित रित्या रहातात आहे- ह्यात सगळ्यात बुद्धिवान प्राणी म्हणजे माणूस. माणसाने आजतागायत नवनवीन शोध लावून जिवन सुख, सोयी आणि समृद्धीचे केले आहे. ही प्रगती आज थक्क करून… Continue reading
-
ऑनलाईन पेमेंट: नवीन फसवणूक प्रकार
Take Care, Avoid Frauds. नमस्कार मी डॉ आशिष रानडे, गायक आणि संस्थापक, कलाश्री संगीत गुरुकुल, नाशिक ! आमच्या संगीत गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी गाण्याचे शिक्षण घेण्यास येत असतात. सध्या मोठया प्रमाणात चालणारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार बघता, या संदर्भात मला आलेला एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो जेणेकरून तुमच्या बाबतीत जर असा काही प्रकार झाला तर तुम्ही… Continue reading
-
जगण्याचा सूर गवसलेला शंतनू !!
“नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन “ हा श्री. शंतनु गुणे, नर्मदा परिक्रमावासी यांचे ‘दृक-श्राव्य अनुभवकथन’ करणारा कार्यक्रम ३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे संपन्न झाला !! या कार्यक्रमास जिज्ञासूंनी उदंड प्रतिसाद दिला . श्री. गुणे यांनी व्यक्त केलेल्या अतिशय भावपूर्ण आणि प्रवाही अशा अनुभूतीमधून श्रोत्यानाही नर्मदा… Continue reading
-
Narmada Parikrama
नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन आनंद म्हणजे , जीवनाला दिलेल्या डोळस प्रतिसादामुळे आपल्यातीलच एक अनोख्या पाकळीचं आपसुक उमलणं आणि तिच्या विश्रब्ध सुंगंधात आपणच हरवून जाणं ! दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेला परमअलौकिक नर्मदामाईच्या दिव्य परिक्रमेचा संकल्प बरोबर चार महिन्यांच्या पदभ्रमणाने पूर्णत्वास गेला आहे याचे कारण ज्याक्षणी मी हा संकल्प केला त्याक्षणापासून नर्मदामाईने माझ्या कायेला कवचकुंडले… Continue reading
-
कठीण समय येता
मे २०२४ सिंगापूर ट्रीप मधील अनुभव !! हा अनुभव आहे मे २०२४ च्या आमच्या सिंगापूर ट्रीप मधला !! या दिवशी आमच्या आयटर्नरीत , Marina Bay Sands या सिंगापूरची ओळख बनलेल्या आणि मरीना बे च्या समोर असणाऱ्या आलिशान हॉटेलच्या ऑब्झर्व्हेटरी डेकचा अनुभव समाविष्ट होता ! त्या लगतच असणारे, अतिशय नयनरम्य असे क्लाउड फॉरेस्ट , फ्लॉवर डोम… Continue reading
-
Kavita
डाएट नि वेटलॉस… डाएट नि वेटलॉसचा, करून गवगवा फार,भूक लागताच मन, लगेच मानते हार !! बर्गर, पिझा, जंकफुडचे, ऑप्शन चवदार,स्विगी, झोमॅटो तत्सम, पर्याय आहेत फार,डाएटची तपश्चर्या, जिभेपुढे फरार,पदार्थांवर ताव मारून, मन मारते हार !! आरशात पाहून, पोटावरची घडी,मन म्हणते घालवीन ही, तरच नावाची खरी,पण समोर येताच चितळेंची बाकरवडी,फस्त करायला, मी लगेच मारते उडी !! भरमसाठ… Continue reading
-
Financial Literacy for Women
विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच… Continue reading
-
बालविवाह : जनजागृती गीत
भारतामध्ये बालविवाह बेकायदा असला तरी या संदर्भातल्या घटनांना पूर्णपने आळा बसलेला नाही, ही शोकांतिका आहे. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाह या रुढीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, लाला गिरधारीलाल यांनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे… Continue reading
-
Ustad Rashid Khan..Shradhhanjali !
उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली : प्रसाद खापर्डे मेरे गुरुजी..,उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली और विनम्र नमन, कुछ यादों के साथ। मै कोई लेखक नही , लेकिन उस्तादजी के जाने का दुख इतना है कि उनके साथ बिताए हुए वर्षोंकी सारी यादें उमड़ आई और पहेली बार लिखने का प्रयास कर… Continue reading
Recent Posts
